Monday, 27 November 2023

26 November

 

भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.

भारतीय संविधाननाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो

सुरुवातीला भारत या देशावर इंग्रजांचे राज्य होते, इंग्रजांनी या भारत देशावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले, भारताला या इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र मिळवण्यासाठी भारतातील अनेक समाजसुधारक क्रांतिकारक, यांनी आपल्या जीवनाचे बलिदान देऊन  भारताला स्वतंत्र मिळवून दिले.

स्वतंत्र मिळवून देण्याचा उद्देश, हा जातीभेद, वर्णभेद, राजकारण, एकमेकाची टिंगल टवाळकी  करणे, जाती जाती मद्धे द्वेष पसरविणे, दारू पिणे पत्ते खेळणे, एकमेकांच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे, कोणाची माघारी निंदा करणे  हा स्वतंत्र मिळवून देण्याचा उद्देश नव्हता

स्वतंत्र मिळाल्यानंतर  भारतातील नागरिकांनी  सुजान नागरिक व्हावे, चांगले शिक्षण घ्यावे, गोरगरिबांना मदत करावी, सर्व जाती धर्मामध्ये शांतता प्रस्थापित राहावी, लहान मोठ्यांचा आदर करावा, शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, हा होता.

15 ऑगस्ट १९४७ ला आपला भारत  देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला.

150 वर्ष गुलामगिरी

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद,
घटना समितीचे उपाध्यक्ष हरेंद्रकुमार मुखर्जी

भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण 2  वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. 

अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.

भारतात २६ जानेवारीला हा प्रजासत्ताक दिन म्हणून  साजरा केल्या जातोय.

त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

२६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला

1.46 लाख शब्द असलेले  भारताचे संविधान हे एका  जगातील सर्वात मोठे संविधान लिखित संविधान आहे. 

448 आर्टिकल्स, 25 पार्टस, 12 शेड्युल्स आहे

एकूण घटनादुरुस्त्या१०५

पुढे डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले.त्या वेळेस पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू  होते
डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील
भारतीय संविधान हे भारत देशाला एकता, न्याय समानता, आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्व भारतीयांना एकत्र जोडणारे आहे

भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार तसेच कर्तव्य सर्व भारतीयांना संस्कारीत करणारी आहे


अशी आहे भारतीय संविधानाची अस्तित्वात असलेली प्रस्तावना...

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य : दर्जाची व संधीची समानता : निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून : आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे.

1.40 कोटी लोकसंख्येला भारतीय संविधान चालवते

भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.

कलम 14 कायद्यापुढे सर्व सामान आहे
कलम 15 धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास  सक्त मनाई आहे
कलम 16 सर्वांना शासकीय  कामात नोकरीत समान संधी असेल
कलम 17 अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे
कलम 18 ब्रिटिशांनी बहाल केलेले किताब नष्ट करण्यात आले आहे
कलम 19 स्वतंत्र्याविषयी
कलम 20 सर्व नागरिकांना असंगत शिक्षेपासून संरक्षण दिले आहे.
कलम 21 या देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून
सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे
म्हणजे वैयक्तिक स्वतंत्र आहे
कलम 22 अटक किंवा जेल झाल्यावर काही अधिकार दिलेले आहे
या देशातील या सर्वात महान दिनाबद्दल माझे विचार ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार.
जय हिंद, जय भारत

No comments:

Post a Comment